Wednesday, January 9, 2013

Fuck All Pakistani Army हिंमत आहे? घुसा पाकिस्तानात!

अरे मुर्दाडांनो, नुसते कागदी निषेध कसले करता? त्यांचे हे कृत्य चिथावणीखोर आहे ना? त्यांनी तुम्हाला चिथावणी दिली आहे ना? स्वीकारा आव्हान आणि घुसा पाकिस्तानात!
हिंमत आहे? घुसा पाकिस्तानात!
पुचाट राज्यकर्ते!
हिंदुस्थानच्या संरक्षणमंत्र्यांनी राजीनामा देऊन घरी जावे, असा भयंकर प्रकार सीमेवर घडला आहे. पाकड्या सैनिकांनी आमच्या हद्दीत घुसून हिंदुस्थानी जवानांच्या गस्तीपथकावर हल्ला चढविला. धारदार शस्त्रांनी दोन जवानांचा शिरच्छेद करून त्यांना हाल हाल करून ठार केले. एका जवानाचे शिर कापून पाकिस्तानात नेल्याचेदेखील वृत्त आहे. देशाने पेटून उठावे, ‘जय हिंद जय जवान’चा नारा देत हाती मिळेल ते शस्त्र घेऊन हिंदुस्थानी जवानांच्या मदतीस जावे असा हा प्रसंग आहे. हिंदुस्थानी सरकारच्या षंढपणाचा यापेक्षा पुरावा तो कोणता? काय करायचे आहेत तुमचे ते धूळ खात पडलेले अणुबॉम्ब? तुमचे ते लष्करी सामर्थ्य? तुमची लढाऊ विमाने? पाकिस्तानसारखा टिनपाट देश आपल्या हद्दीत घुसून जवानांचा शिरच्छेद करतो आणि संरक्षणमंत्र्यांनी लुंगी सावरत काही हालचाल केली असेही होत नाही. ज्यांना आपली लुंगीही सावरता येत नाही ते देशाला काय सावरणार? निषेधाचे पुचाट शब्द उच्चारून घडलेल्या निर्घृण घटनेवर पाणी ओतण्याचा प्रकार मात्र लगेच सुरू झाला आहे. असे पुचाट राज्यकर्ते दिल्लीत असल्यावर पाकिस्तानच्या फौजा दिल्लीत घुसून दोन-चार मंत्र्यांची डोकी उडवायलाही कमी करणार नाहीत. नाही तरी अफझल गुरू हिंदुस्थानच्या संसदेत घुसलाच होता व त्याने आपली संसद रक्तबंबाळ केलीच होती. हिंदुस्थानी हद्दीतील पाकिस्तानी घुसखोरीची ही पहिलीच घटना नाही. १९९९ सालचे 
कारगील युद्ध अशाच घुसखोरीतून 
पेटले व घुसखोर पाक सैनिकांना बाहेर काढण्यासाठी एक महिन्याचे युद्ध पुकारावे लागले. आश्‍चर्य असे की, कारगीलचे युद्ध पाकिस्तानच्या नव्हे तर हिंदुस्थानच्या हद्दीत झाले. तरीही एक महिना ते चालले. आता सोमवारचा प्रकारही पुन्हा एकदा कश्मीर खोर्‍यात घडला. पूंछ जिल्ह्यातील मानकोट येथे नियंत्रण रेषेपासून १०० मीटर अंतरावर हे सर्व घडले. दोन लान्स नायक हेमराज व सुधाकर सिंग यांची हत्या करून त्यांचे शिर धडावेगळे करण्यात आले. जवानांची ही विटंबना आहे. पाकिस्तानच्या सीमेवर हाती बंदुका घेऊन ‘कसाई’ उभे आहेत व आमच्या सीमेवर मात्र गणवेशातील शिस्तबद्ध जवान उभे आहेत. त्यामुळे पाकच्या कसायांनी त्यांना साजेसे वर्तन केले. याआधीही कारगील युद्धाच्या वेळी कॅप्टन सौरभ कालिया यांचा असाच छळ पाकिस्तानी लष्करी जवानांनी केला होता. त्यावेळीही क्रौर्याची परिसीमाच गाठली होती. सौरभ कालिया यांचा तब्बल २२ दिवस पाकने छळ केला. त्यांचे हातपाय तोडले. डोळे-कान फोडले. सिगारेटचे चटके दिले व छिन्नविच्छिन्न मृतदेह हिंदुस्थानच्या हद्दीत फेकून दिला. दुश्मनांचा असला तरी एक जवान दुसर्‍या जवानाचा सन्मान करतो ही परंपरा आहे, पण पाकड्या नराधमांनी या परंपरेस नेहमीच हरताळ फासला आहे. आतादेखील या सर्व प्रकारावर हिंदुस्थानच्या संरक्षणमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया इतकी पचपचीत आहे की, देशाची मान शरमेने खाली झुकली आहे. ‘‘पाक सैन्याचे हे कृत्य चिथावणीखोर असून याबाबत पाकिस्तानला जाब विचारला जाईल. तसेच या हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करीत आहोत!’’ अरे मुर्दाडांनो, नुसते कागदी निषेध कसले करता? त्यांचे हे कृत्य चिथावणीखोर आहे ना? त्यांनी तुम्हाला चिथावणी दिली आहे ना? मग नुसते ‘चीं चीं’ करीत कसले बसले आहात? स्वीकारा आव्हान आणि घुसा पाकिस्तानात! त्यांनी तुमची दोन डोकी क्रूरपणे उडवली, तुम्ही चाळीस उडवा. ते करायचे सोडून 
संरक्षणमंत्री डोक्याला झंडू बाम 
चोळत बसले आहेत? इकडे हिंदुस्थानात पाकड्यांबरोबर क्रिकेटचे सामने सुरू आहेत. झाले गेले विसरून पाकड्यांशी क्रिकेट खेळावे असे सरकारचे गृहमंत्री सांगत आहेत आणि तिकडे सीमेवर तेच पाकिस्तानी आमच्या जवानांची मुंडकी उडवीत आहेत. अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, चीन, इस्राएल इतकेच काय, एखाद्या लहान देशाच्या बाबतीत हा प्रसंग घडला असता तर लगेच त्या देशाने मूंहतोड जवाब देऊन दोन जवानांच्या हत्येचा बदला घेतला असता. कारण असे करण्यातच देशाचा स्वाभिमान व जवानांचा बहुमान असतो; पण हिंदुस्थानच्या संरक्षण मंत्रालयाने फक्त निषेध केला आहे. पाकिस्तानचे क्रिकेटपटू हिंदुस्थानात ‘मौजा’ मारीत आहेत. सर्वप्रथम त्यांना इकडून लाथ मारून हाकलून दिले पाहिजे. जे चित्रपट निर्माते पाकिस्तानी कलावंतांना त्यांच्या पडद्यावर स्थान देतील त्या निर्मात्यांवर, टीव्ही वाहिन्यांवर राष्ट्रद्रोहाचे खटले दाखल करून त्यांची धिंड काढायला हवी. पाकिस्तान आपल्याशी ‘कसाया’प्रमाणे वागत असताना आपण त्यांच्याशी हलवायाप्रमाणे वागणे हा आमच्या वीर जवानांचा अपमान आहे. हा देश नामर्दांचा नाही. राज्यकर्ते षंढासारखे वागत असले तरी जनता राष्ट्राभिमानी आहे. हिंदुस्थानी जवानांचा शिरच्छेद ती सहन करणार नाही. यापुढे पाकिस्तानचे गोडवे गाणारे, राजकीय-सांस्कृतिक संबंधांची वकिली करणारे कोणीही असोत ते देशाचे दुश्मन मानायला हवेत. पाकिस्तानी सैन्याचा हा ‘भ्याड’ हल्ला असल्याचे हिंदुस्थानी राज्यकर्त्यांनी म्हटले आहे. आम्ही विचारतो? हा कसला भ्याड हल्ला. हा हिमतीचा हल्ला असून हिंदुस्थान सरकार ‘भ्याड’ ठरले आहे! अशा भ्याडांच्या हाती देश सुरक्षित नाही. राज्यकर्ते ‘भ्याडा’सारखे वागत असले तरी जनतेने शेपूट घातले नाही हे दाखवून द्यायची वेळ आली आहे. भ्याड राज्यकर्त्यांनो, थूत तुमच्या जिनगानीवर.

No comments:

Post a Comment